भारतात मुलभूत बदल घडवण्यासाठी आणि देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. एकविसावे शतक भारताच्या नावे करण्यासाठी कठोर मेहनत करा, त्यात अनेक अडथळे येतील. परंतु अडथळे दूर केल्यानंतर भारताला नव्या उंचीवर नेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी फ़िलिपाइन्सची राजधानी मनिला येथे भारतीयांशी संवाद साधतांना केले. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनकडून आक्रमक विस्तारवादी धोरण राबविले जात आहे. याला शहा देण्यासाठी नेहमी ट्रम्प ह्यांकडून त्याचा हिंदी-प्रशांत विभाग असा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे भारत,जपान,अमेरिका,आणि ऑस्ट्रेलिया अशी नवी आघाडी उभी होत आहे. शिवाय भारतात बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत, त्यामुळे “आसियान” देशांनी भारतात गुंतवणूक करावी असेही ते म्हणाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews